Ticker

6/recent/ticker-posts

*मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणा विरोधात माकप व किसान सभाच्या वतिने किनवट तालुक्यातील अनेक गावात जोरदार आंदोलने*


*मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणा विरोधात माकप व किसान सभाच्या वतिने किनवट तालुक्यातील अनेक गावात जोरदार आंदोलने*


 :भाजप च्या मोदी केंद्र सरकारने कोरोना संक्रमण चे काळात लावलेल्या लॉकडाउन मध्ये मोठ्या प्रमाणावर जनविरोधी धोरणे, कायदे राबवून सामान्य जनतेलाच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला खाली आणून देशातील जनतेला भुखमरी वर आणले आहे. कामगार, शेतकरी,शेतमजूर, असंघटित कामगार, छोटे व्यावसायिक पूर्णपणे देशोधडीला लागले आहेत, त्या मुळेच देशपातळीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने ९ आगस्ट क्रांतिदिनी व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या निषेध करून जनविरोधी धोरणे रद्द करा किंवा खुर्च्या खाली करा हा नारा देत किनवट तालुक्यातील अनेक गावात जोरदार आंदोलने केली.   
कॉम्रेड अर्जुन आडे  आंदोलने  क*मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणा विरोधात माकप व किसान सभाच्या वतिने किनवट तालुक्यातील अनेक गावात जोरदार आंदोलने*

 :भाजप च्या मोदी केंद्र सरकारने कोरोना संक्रमण चे काळात लावलेल्या लॉकडाउन मध्ये मोठ्या प्रमाणावर जनविरोधी धोरणे, कायदे राबवून सामान्य जनतेलाच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला खाली आणून देशातील जनतेला भुखमरी वर आणले आहे. कामगार, शेतकरी,शेतमजूर, असंघटित कामगार, छोटे व्यावसायिक पूर्णपणे देशोधडीला लागले आहेत, त्या मुळेच देशपातळीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने ९ आगस्ट क्रांतिदिनी व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या निषेध करून जनविरोधी धोरणे रद्द करा किंवा खुर्च्या खाली करा हा नारा देत किनवट तालुक्यातील अनेक गावात जोरदार आंदोलने केली.  
यावेळी किनवट येथील आंदोलनात शेतकरी - कामगारांना देशोधडीला लावणारे सरकार चले जाओ असे मत काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करा, राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज ताबडतोब द्या,घरगुती व कृषिपंपाची वीज बिल माफ करा, २०२० चे वीज विधेयक रद्द करा,युरिया ची कृत्रिम टंचाई दूर करून शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्या,  प्रत्येक पिकाला उत्पादन खर्च अधिक ५०% नफा हमीभाव जाहीर करा व हमीभावा पेक्षा कमी दरात खरेदी करणार्यांवर गुन्हे दाखल करा, पेट्रोल, डिझेल व गॅस चे भाव निम्म्याने कमी करा, लाभार्थ्यांमध्ये वर्गवारी न करता प्रत्येक कुटूंबाला दरमहा 20 किलो धान्य, १ ली तेल, १ की डाळ, १ की साखर देण्यात यावे, केंद्र सरकारच्या मोफत धान्य वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा,  लॉकडाउन काळात प्रत्येक कुटुंबाला दरमहा ७५०० ₹ आर्थिक मदत द्या, केंद्र सरकारने घेतलेले नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा व ऑनलाइन शिक्षण पद्ध्ती रद्द करा आदि मागण्या ह्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या.
किनवट तालुक्यात तोटंबा, मांनसींग नाईक तांडा, दिपला नाईक तांडा, चंद्रु नाईक तांडा, मार्लागोंडा, चिखली, कंचली, अप्पारापॆठ, दुर्गानगर, रीठ्ठा, नंदगाव, नंदगाव तांडा, परोटी , बुरकुलवाडी, पांगरी ,हुडी, कुपटी सोनवाडी, लोखंडवाडी, कनकी,नागापुर, लोणी, तल्हारी आदि गावात हे आंदोलने झाली.

ह्या आंदोलनात मागण्याचे निवेदन ग्रामसेवक,तलाठी यांना वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आले.