Ticker

6/recent/ticker-posts

कांदा निर्यात बंदी ही केंद्र सरकारची चूक, उदयनराजेंचा मोदी सरकारला घरचा आहेर


सातारा : भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोणत्याही पक्षात असोत ते कायमच आपल्या भूमिकांवर ठाम असतात. राष्ट्रवादीत असतानाही त्यांनी अनेकदा पक्षाला घरचा आहेर दिला होता. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून आजपर्यंत त्यांनी पक्षविरोधी वक्तव्य केलं नव्हतं. मात्र आता त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आवाज उठवताना थेट मोदी सरकारच्याच निर्णयाचा विरोध केला आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्याती बंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्याबाबतचं पत्रक त्यांनी काढलं आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा असल्याचा पत्रकात त्यांनी स्पष्ट उल्लेख करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णय चुकीचा असल्याचं सांगताना याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


 
शेतकरी लॉकडाऊनमुळे बॅकफुटवर गेला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात नेणारा आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पत्रकात केली आहे.

उदयनराजे भोसले पत्रात नेमकं काय म्हणाले?

“केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यातबंदी ही शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त करणारी आहे. केंद्र सरकारने या निर्यातबंदीचा निर्यण तात्काळ मागे घ्यावा घेवून, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं मला वाटते.”



“कांद्याचे उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात खरं तर संपूर्ण देशाला सावरण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. संपूर्ण देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे. अशावेळी निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात तेव्हा कांदा फेकावा लागतो. पण आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना असा निर्णय घेणे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरीत मागे घ्यावी, जेणेकरुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.”

“आधीच लॉकडाऊनच्या काळात संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असताना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल आणि त्यांचे फार मोठे नुकसान होईल याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपण कांद्यावरची निर्यातबंदी त्वरीत उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतूकदारांना दिलासा द्यावा. त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांद्यावर अवलंबून आहे. तरी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय, या तीनही मंत्रालयांनी व्यापक हित लक्षात घ्यावे. अन्यथा अचानक केलेल्या निर्यातबंदीमुळे भारताच्या निर्यात धोरणाला जागतिक स्तरावर फटका बसू शकतो, याचाही आपण विचार करावा ही आग्रहाची विनंती.
हैलो दोस्तों, यूट्यूब चैनल *aaj ki news kinwat में 
 हमारे विडीयो को 👍 लाईक कीजिए, 👉 शेयर कीजिए  *कमेंट्स* 🖊में आपकी प्रतिक्रिया देकर हमारे चैनल *आज की न्युज किनवत* को *सब्सक्राइब* कीजिए। ओर दोस्तों 🔔 *बेल आइकॉन* को प्रेस करना ना भूलें ताकी हमारे नए वीडियोज़🎬 कि अपडेट आपको मिलती रहे
नितीन मधुकर कालेकर आज् की न्युज जिल्हा प्रतिनिधी पुणे
जाहिरातीसाठी सम्पर्क-8551888031