Ticker

6/recent/ticker-posts

एकलव्य रेसिडेंसिएल पब्लिक स्कूल ऑनलाईन प्रवेश परीक्षा कोरोना प्रादुर्भावाने रद्द ; निवडीसाठी मागील सत्रातील गुण लिंक भरावी-प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार


एकलव्य रेसिडेंसिएल पब्लिक स्कूल ऑनलाईन प्रवेश परीक्षा कोरोना प्रादुर्भावाने रद्द ; निवडीसाठी मागील सत्रातील गुण लिंक भरावी
-प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार

 किनवट / तालुका प्रतिनिधी राजेश पाटिल आज की न्यूज़: आदिवासी विद्यार्थ्यांची एकलव्य रेसिडेंसिएल पब्लिक स्कूल मध्ये प्रवेशासाठी होणारी ऑनलाईन परीक्षा कोरोना प्रादुर्भावाने रद्द करण्यात आली असून आता मागील सत्रातील गुणांच्या आधारे निवड होणार असल्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य शाळेतील मुख्याध्यापकांनी ऑनलाई अर्ज केलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याचे सन २०१९ -२० या शैक्षणिक वर्षातील इयत्ता ५ वी ते ९ वीतील गुण लिंक मध्ये १५ सप्टेंबर २०२० पर्यंत भरावी, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार, भाप्रसे, यांनी केले आहे.
               विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेच्या प्रथम सत्राच्या  स्कॅन केलेली गुणपत्रिकेची प्रत png, jpeg, jpg, pdf ह्या स्वरूपात असावी. शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरलेले असतील ,तर प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरावी तसेच गुणपत्रक स्वतंत्र अपलोड करावे.फॉर्म भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२० आहे.ऑनलाईन आवेदन पत्र भरतेवेळी पालकांनी अथवा शिक्षकांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रवेश प्रकिया सुरु झाल्याबाबत शाळेचे मुख्याध्यापक आणि पालक यांना SMS आल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्याच्या शाळेत जाऊन मागील शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राचे गुणपत्रक प्राप्त करून घ्यावयाचे आहे. 
            यानंतर पालकांनी स्वत: अथवा शिक्षकांच्या मदतीने mtpss.org.in हे संकेतस्थळ आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये किंवा गावातील एखाद्या संगणक केंद्रावर जाऊन विद्यार्थ्याचा अर्ज भरण्याकरिता कार्यवाही करावी. 
           जे विद्यार्थी (त्यांचे पालक/शिक्षक/मुख्याध्यापक) वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या अर्जामध्ये विहित मुदतीत (१५ सप्टेंबर २०२०) गुणांची नोंद करणार नाहीत, त्यांचा गुणवत्ता यादी तयार करताना समावेश होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
            विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या प्रथम सत्राच्या गुणांची एकूण ९०० पैकी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत गुणांऐवजी श्रेणी नोंदविण्यात येऊ नये. हाच निकष इयत्ता ७ वी ते ९ वीच्या रिक्त जागेवरील प्रवेशासाठी लागू करण्यात आलेला आहे. इयत्ता ५ वीचे परिसर १ आणि २ या विषयांचे गुण ५० पैकी, दिलेले असल्यास सदरील गुण १०० पैकी रुपांतरित करून भरण्यात यावेत. असे आवाहन प्रकल्प अधिकारी किर्तीकिरण यांनी केले आहे .