Ticker

6/recent/ticker-posts

….तर एअर इंडिया कायमची बंद करणार; मोदी सरकारचा खुलासा


नवी दिल्ली :सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने खूप पूर्वीच सरकारी मालकीची एअर इंडिया ही विमान कंपनी विक्रीला काढली आहे. मात्र, सरकारने आता कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली आहे.

हरदीपसिंह पुरी यांनी एअर इंडियासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, शक्य झाल्यास सरकार ही कंपनी सुरु ठेवेल. मात्र कंपनीवर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. विमान संशोधन विधेयक २०२० राज्यसभेमध्ये सादर करण्याआधी पुरी यांनी सभागृहाला ही माहिती दिली. एकीकडे कंपनी बंद करण्याचे वक्तव्य करतानाच दुसरीकडे पुरी यांनी या कंपनीला लवकरच नवा मालक मिळेल आणि त्याचे उड्डाण यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


 
पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०११-१२ पासून आतापर्यंत केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये ३० हजार ५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही कंपनी विकल्यानंतरही सरकारला फारसा फायदा होणार नाही. हवाई क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ कपिल कौल यांनी लाइव्ह मिंटला दिलेल्या माहितीनुसार या कंपनीच्या विक्रीतून सरकारला फार काही मिळण्याची अपेक्षा नाहीय. सध्या उपलब्ध निधी आरोग्य, शिक्षण, बांधकाम यासारख्या इतर महत्वाच्या गोष्टींसाठी वापरण्याचा सरकारचा विचार आहे.

या सहा कंपन्याही बंद करणार
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार खालील कंपन्या बंद करण्याच्या विचारात आहे. शिवाय आणखी २० कंपन्यामध्ये निर्गुतवणूक करण्याचा विचार सरकार करीत आहे.

१) स्कूटर्स इंडिया
२) हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड
३) भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड
४) हिंदुस्तान प्रीफॅब
५) हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट
६) कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिट