Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता प्र दि 5 राज्यात व देशात अनलॉक 5 सुरू झाला असून ही किनवट तालुक्यातील नागरिकांना मुंबई सह राज्यातील व देशातील


किनवट ता प्र दि 5 राज्यात व देशात अनलॉक 5 सुरू झाला असून ही किनवट तालुक्यातील नागरिकांना मुंबई सह राज्यातील व देशातील 

विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी एक ही रेल्वेगाडी उपलब्ध करून देण्यात न आल्याने किनवट तालुक्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



राज्यासह देशाच्या विविध ठिकाणी अनेक रेल्वेगाड्या येत्या 15 ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत त्या पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यातून जाणारी व किनवट तालुक्यातील नागरिकांच्या उपयोगाची एक ही रेल्वे गाडी सुरू न झाल्याने नागरिकांना दसरा व दिवाळी सणांमध्ये आपल्या घरी येण्यास खाजगी भाड्याच्या वाहनाच्या हजारो रुपयाचा भुर्दंड उचलावा लागणार आहे 

या सोबतच जे रुग्ण रुग्णालयात जातात किंवा कॅन्सर या आजारासह विविध आजारासाठी मुंबई येथे जातात त्यांनी अतोनात गैरसोय रेल्वे बंद असल्याने झाली आहे .


किनवट तालुका हा नांदेडच्या पालकमंत्री कडून नेहमीच दुर्लक्षित असा तालुका राहिला आहे तरी हिंगोली लोकसभा क्षेत्रा अंतर्गत एकही रेल्वे सुरू झाली नसल्याने खासदार हेमंत पाटील यांनी या बाबत योग्य तो पाठपुरावा करावा अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत 

तर मुंबई ते नागपूर अशी धावणारी नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी ज्याचा गाडी क्रमांक 11401/02 असा हे ती गाडी किमान मुंबई ते किनवट अशी सोडण्यात यावी ही मागणी किनवट सह बोधडी, हिमायतनगर, भोकर, उमरखेड, माहूर, मांडवी, ढानकी, मुदखेड सह 


नांदेड येथून किनवट अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची आहे ही गाडी सुरू झाली तर नागरिकांना खूप सोईस्कर अशी ही गाडी ठरणार आहे तरी राज्यात येत्या 15 ऑक्टोबर पासून ज्या रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे


 त्याच्या आधी नंदीग्राम एक्स्प्रेस या गाडीसाठी  गाडी सुरू करण्याचे प्रयत्न झाले तरच ही गाडी दिवाळी पूर्वी नागरिकांना उपलब्ध होऊ शकते परंतु त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती 

लागणार आहे ती इच्छाशक्ती दाखवून गाडी सुरू होते की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.