महाराष्ट्रातील तालिबाण्याचा जाहीर निषेध,जिवती चंद्रपुरात घडलेली घटना प्रति खैरलांजीच आहे!
दलित वृद्धांना अशाप्रकारे बांधुन मारणे मानवतेला काळिमा फासने आहे.
आजच्या महाराष्ट्राचा हाच खरा
जातीय चेहरा आहे.
खैरलांजीच्या धर्तीवर हे प्रकरण घडलेलं आहे. सामूहिक मॉब लिंचिंग होता होता राहिली.
महाराष्ट्राच्या ग्रहमंत्र्याला खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही.
महाराष्ट्रात दलित असुरक्षित आहेत,
भयभीत आहेत. स्मशानभूमी नाकारली
जाते तर
कधी भरचौकात भानामतीच्या संशयावरुन वृद्धांना डांबून मारलं जाते.
जिवती, चंद्रपूर घटनेचा जाहीर निषेध!
सर्व गावाला आरोपी करावे,
सरपंच पोलीस पाटील सर्वांना
यात आरोपी करावे,
ग्रामपंचायतला जातीयवादी ग्रामपंचायत
म्हणून घोषित करून त्यांना निधी देऊ नये,
सर्व आरोपींना अटक करावी,
पीडितांचे पुनर्वशन झाले पाहिजे,
त्यांना संरक्षण दिले पाहिजे.
निष्क्रिय मुर्दाड गृहमंत्र्यांनी तात्काळ
राजीनामा द्यावा.
राज्य सरकारने तात्काळ दलित अन्याय अत्याचार रोखण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल!