Ticker

6/recent/ticker-posts

गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वार्ड मध्ये पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावे - आशिष शेळके (तालुकाध्यक्ष, जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य


गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वार्ड मध्ये पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावे - आशिष शेळके (तालुकाध्यक्ष, जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य).

आशिष शेळके यांनी गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रविन रावळे यांच्या सोबत केली सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा.

किनवट : मौजे गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व वार्ड मध्ये पथदिवे व सर्व खांबावरचे बल्ब लवकरात लवकर लावण्यात यावी अशी मागणी जनता माहिती अधिकार समिती 

महाराष्ट्र राज्य चे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक प्रविन रावळे यांना केली आहे.
      

    सविस्तर वृत्त असे की, बऱ्याच महिन्यांपासून गोकुंदा ग्रामपंचायत मधील बऱ्याच वार्ड मध्ये पथदिवे व खांबावरचे बल्ब खराब झाले आहेत

 त्यामुळे सर्व वार्ड मधील नागरिकांमध्ये रात्री ला भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खांबावरती पथदिवे व बल्ब नसल्या कारणाने चोरीचे व लुटमारीचे प्रमाण ही वाढले आहेत, 

तसचे आता दिवस ही लवकर मावळत आहे तर काही विद्यार्थ्यांना देखील कोचिंग क्लासेस मधुन येताना अंधारातच घरी यांव लागत आहे त्यामुळे या अंधारामुळे पालक व विद्यार्थी दोघेही त्रस्त आहेत.

 तसेच महिला व लहान मुले-मुली आता दुर्गा उत्सव निमित्त गर्भा खेळण्यासाठी घरापासून दुर दुर्गा देवी व शारदा देवीकडे जात असतात, 

तेव्हा गर्भा खेळुन परत येताना आपापल्या वार्ड मध्ये सर्वीकडे अंधार असल्या कारणाने महिला व लहान मुले-मुली भितीमय परीस्थितीत घरी येत आहेत.

 या सर्व कारणांमुळे काही वाईट प्रकरण घडण्याच्या आधी सर्व वार्ड मध्ये लवकरात लवकर पथदिवे व खांबावरचे बल्ब लावण्यात यावी

 अशी मागणी जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य चे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी ग्रामसेवक प्रविन रावळे यांच्याकडे केली आहे.
         

 तसेच या अंधाऱ्याच्या समस्या सोबतच नाल्या साफसफाई व कचरा गाडी च्या समस्यां देखील आशिष शेळके यांनी सांगितल्या. सर्व वार्ड मध्ये नाली ही कचऱ्यांनी व पाण्यांनी तुडुंब भरली आहे 

तरी बऱ्याच वार्ड मध्ये नाली साफसफाई कामगार हे बऱ्याच महिन्यांपासून आलेले नाही आहेत. तसेच काही वार्ड मध्ये भरपुर कचरा व घाणीचा ढीग झाला आहे

 त्यामुळे वार्ड मध्ये दुर्गंधी चे व मच्छरांचे व रोगराईचे प्रमाण वाढले आहे.

 त्यामुळे कचरा गाडी व नाली सफासफाई कामगारांना दर हफ्त्यांला सर्व वार्ड मध्ये पाठवावे अशे आशिष शेळके यांनी ग्रामसेवक यांना सांगितले.
          

पत्रकारांशी बोलताना आशिष शेळके यांनी सांगितले की, 

ग्रामसेवकांनी सर्व समस्या, सुचणा जाणून घेतल्या व या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी लागलीच तयारीला लागतो अशे आश्र्वासन दिले. 

व येत्या आठ दिवसांमध्ये सर्व वार्ड मधील पथदिवे व खांबावरचे बल्ब आणि नालीसाफसफाई व कचरा गाडी हे सर्व समस्या सुटणार अशी ग्वाही दिली. 

अभ्यासु व कर्तव्यदक्ष ग्रामसेवक अशी प्रतिमा असणारे ग्रामसेवक प्रविन रावळे हे त्यांचा शब्द पाळुन आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहुन 

या सर्व समस्या खरंच आठ दिवसांत सुटणार का यांकडे गोकुंदा ग्रामपंचायत मधील सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.