Ticker

6/recent/ticker-posts

सारखणी येथील जंगलात वनवा पेटला अख्खा जंगलातील झाडे झुळपे जळून खाक


सारखणी येथील जंगलात वनवा पेटला अख्खा  जंगलातील झाडे झुळपे जळून खाक

सचिन जाधव/ सारखनी दि.19/04/2022

येथील जंगलाला आग लागून पाच दिवस उलटूनही वन कर्मचाऱ्यांना आग विझविण्याला यश  आले नाही उन्हाळ्याचा पारा वाढल्या असल्याने अधिकारी कर्मचारी एसी (AC)कुलरची हवा खात असून आखा जंगल  जळूननही वन कर्मचारी झोपेचे सोंग घेत असून 

त्यांचे जंगलाकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने वनवा पेटला रात्रीच्या वेळी जंगलात लाईट लागल्यासारखे जंगल दिसत आहे

 अशा निष्काळजी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर खडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे
किनवट तालुक्यातील मांडवी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सारखणी बीटात निराळा निराळा तांडा टेंभी या जंगलात 

दोन दिवसापूर्वी मोठी आग  लागली होती तेथील आग काही दिवसांनी आग विझवण्यात आले मात्र सारखणी जंगलात पाच दिवसापासून वनवा पेटला असून आग विजवण्यासाठी कर्मचारीवर्ग अपथशी ठरले असून 

जंगलात आग लागली आगीचे भयानक चित्र ते उघड्या डोळ्याने पाहूनही आग विजवण्यासाठी पर्यत्न का करीत नाही 

अशा प्रश्न पुढे येत आहे या प्रकाराकडे वन कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे

जंगलातील मौलयवान सागवान वृक्ष वन औषधी साठा जंगलात पडून आहे तोही जळून खाक झाला आहे 
या भागातील जंगलात पाच दिवसापासून अचानक लागलेल्या आगीत शेकडो एकर जमिनीतील

 वन औषधी व मौल्यवान सागवान झाडे जळून खाक झाली आहेत या जमिनीत दोन वर्षांपूर्वी लावलेल्या वन वृक्ष सुद्धा जळून गेल्याचे समजते


ही आग विजवण्यासाठी कसलीही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही

 आज तागायत जंगल जळत आहे तरी वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक वन मजूर झोपेचे सोंग घेतले घेतल्याचे यावरून दिसून येते जंगल जळत असताना झालेली

 अवैध वृक्षतोड लपविण्यासाठी हा कांगावा केल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे
शेरेदार हे बिमारीचे नाटक करून 

किनवट शहरात राहतात या बीटातील वन कर्मचारी एकही मुख्यालयही राहत नाही सारखणी ला वनरक्षक राहतात मात्र तेही असून नसल्यास गिनती आहे 

अश्या निष्क्रिय असलेल्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने मुख्याला ही 
एकही कर्मचारी राहत नाही मग जंगलाचे संरक्षण कोण करणार यांच्या दिरंगाईने राष्ट्रीय संपत्ती नष्ट होत असून याला कारणीभूत वन कर्मचारी व अधिकारी आहेत 

वन कर्मचाऱ्याच्या मिलीभगत मुळे हा प्रकार होत असल्याचे सांगितले जात आहे वन कर्मचारी मुख्यालयी न राहता त्यांच्या वेळेनुसार 

येथे भेट देऊन निघून जातात मग जंगलाचे संरक्षण करणारे अधिकारी कर्मचारी उंटावरून शेळ्या हाकतात असा प्रकार राम भरोसे या भागात सुरू असल्याचे दिसून येते