Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ( किरण ठाकरे) : शहरातील एका सेतू केंद्राच्या माध्यमातून बनावट जातीचे प्रमाण पत्रे बनवल्याचे नुकतेच उघड होवून दोन आरोपी पोलिस कोठडी ची हवा खात आहेत.


किनवट ( किरण ठाकरे) : शहरातील एका सेतू केंद्राच्या माध्यमातून बनावट जातीचे प्रमाण पत्रे बनवल्याचे नुकतेच उघड होवून दोन आरोपी पोलिस कोठडी ची हवा खात आहेत.

 शिक्षण , नौकरी व इतर महत्वाच्या कामासाठी वेग वेगळी प्रमाण पत्र उप विभागिय कार्यालय व तहसिल कार्यालयातून काढली जातात. 

परंतू या कार्यालयात दलालाचा सुळसुळाट झाला असल्याने हा प्रकार घडला असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे.

 तसेच मागील काळात ही काही लाभार्थी व दलालानी आप आपल्या स्वताच्या फायद्यासाठी बोगस प्रमाण पत्र बनवली असावीत अशी शंका नागरीकातून व्यक्त केली जात असून

 संबधीत कार्यालयानी दलाल मुक्त कार्यालय करून मागील पाच वर्षापासून ची बोगस प्रमाण पत्राची चौकशी करण्याची मागणी ही नागरी कातून होत आहे.


किनवट शहरातील एका सेतू केंद्राच्या माध्यमातून बनावट प्रमाण पत्र बनवल्याचे २३ ऑगष्ट २०२२ रोजी उघडकिस आले . 

त्यातील दोन आरोपीस आटक करून त्याना न्यायालयात हाजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली . 

तपासात काल घडलेल्या प्रकरणात आरोपीने तीन जातीचे प्रमाणपत्र बनवले परंतू लाभधारकांना देण्यापूर्वीच ते पकडले गेल्याचे निष्पण झाले . 

परंतू बऱ्याच लोकांनी स्वताच्या फायद्यासाठी व लाभ मिळवण्यासाठी आशा दलाला मार्फत अशी खोटी प्रमाण पत्र काढून घेतली असावी अशी शंका नागरी कातून व्यक्त केली जात आहे . 
खोटे प्रमाण पत्र दिल्याचे निष्पन झाल्याने . 

या घडलेल्या घटनेने शहरासह तालुक्यातील नागरीक चिंता व्यक्त करत आहेत . 

कारण उप विभागिय कार्यालय व तहसिल कार्यालयाची प्रमाण पत्रे शिक्षण , नौकरी व इतर महत्त्वाच्या कामासाठी काढली जातात . 

दोन - तीन हजार रुपये खर्च करून तीन - चार दिवस चकरा मारुन मिळवलेले प्रमाण - पत्र आशा दलालानी स्वतःच्या फायद्यासाठी खोटे प्रमाण पत्र दिले असतील 

किंवा कोण्या लाभधारकाने स्वताच्या फायदयासाठी खोटेप्रमाण पत्र काढले असेल तर ते फार गंभिर बाब आहे . 

कारण नौकरी, शिक्षणा साठी किंवा इतर कामासाठी दिलेले प्रमाण पत्र खोटे निघाल्यास त्याला शिक्षण , नौकरी 

असो किंवा इतर महत्वाचे काम असो त्या पासून त्यांना मुकावे लागते . म्हणून संबधीत कार्यालयाने दलाल मुक्त कार्यालय करून 

या बाबी कडे बारकाईने लक्ष देवून प्रमाण पत्र वितरीत करावी .व मागिल पाच वर्षा पासून ची बोगस प्रमाण पत्राची चौकशी करावी अशी मागणी नागरी कातून होत आहे.