Ticker

6/recent/ticker-posts

*महाराष्ट्रात २०१६ च्या दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी नसल्यामुळे शासन प्रशासन यांचा निषेध करण्यासाठी दिव्यांग आयुक्त पुणे येथे दि.१४ सप्टे.२२ रोजी निषेध आंदोलनाने परिसर दणानला दिव्यांग सं अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले*


*महाराष्ट्रात २०१६ च्या दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी नसल्यामुळे शासन प्रशासन यांचा निषेध करण्यासाठी दिव्यांग आयुक्त पुणे येथे दि.१४ सप्टे.२२ रोजी निषेध आंदोलनाने परिसर दणानला दिव्यांग सं अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले*

 प्रतिनिधी
   
दिव्यांग आयुक्त पुणे येथे 
अपंग जनता दल व महाराष्ट् व दिव्यांग.वृध्द.निराधार मित्र मंडळ महाराष्टृ यांच्या वतीने  अपंग आयुक्त कार्यालय पुणे येथे दि.१४ सप्टे.२२ रोजी निषेध आंदोलनास   महाराष्ट्रातुन दिव्यांग बांधव ऊपस्थित होते.
    महाराष्ट्रात दिव्यांगाना त्यांचा हक्क मिळावा म्हणून  शासननाने दिव्यांग कायदा २०१६ कायदा करून त्यांची  अंमलबजावणी नसल्यामुळे  शासन प्रशासन जागे करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सनदशिर निवेदन, धरणे, ऊपोषण,मोर्चे आंदोलन करून सुध्दा न्याय तर मिळत नाहि,साधे ऊतर मिळत नसल्यामुळे दिव्यांग कायदा फक्त कागदोपत्री राहात असल्यामुळे दिव्यांगाची बाजु कमकुवत असल्यामुळे त्यांच्या व्यंगावर,संपतीबदल,त्यांना त्रास होत असुन त्यांचि हत्या सुध्दा होत आहे संबधित पोलीस स्टेशनकडुन दिव्यांग कायदा कलम  ९२ ची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शासन,प्रशासन जागे करण्यासाठी खालील मांगन्यासाठी दिव्यांगानी आंदोलनात आपला संताप दाखवीला.

   १) *नांदेड येधील अंध अंकुश हट्टेकर ,पती पत्नी दोघेहि अंध असुन यांची सहा  वर्षाची आरोव्हि बालीकेचा खुण,करुन नदीत टाकला तरी पोलिस त्यांची लवकर दखल घेतली नाहि,अशा दोषी अधिकारी यांच्यावर कारवहि करुन खुण करणाऱ्याना फाशी द्यावी या अंध जोडप्याचे पुनर्सवन करावे*.

२) *दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावा म्हणून दिव्यांग हक्क 2016 च्या कायदा करून शासन अनेक निर्णय काढुन प्रशासकिय स्थरावर  अंमल  बजावणी व्हावी म्हणून  ग्रामपंचायत स्थरावर दिव्यांगाच्या ग्रामसभा घेऊन कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश 
असताना अंमलबजावणी होत नसल्यामुळे शासन प्रशासन जागे करण्यासाठी सोल्हापुर जिल्ह्यात दिव्यांग बाधव  हक्कासाठी ऊपोषण करतेवेळी  कु.वैष्णवी कुरळे चा मृत्यु झाला यास शासन,प्रशासनाच्या निष्काळ जीपणामुळे जीव गमावला अशा दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाहि करून कुंटुबाला शासनाने मद करावी*

३) *दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर*
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्यात येऊन अनेक दिव्यांगाना साहित्य आजहि पंचायत समितीने पुर्णपणे वाटप केले नसल्यामुळे शाळेच्या पटागणात गंजुन गेले आहे ते जर वेळेवर वाटप व्हावे म्हणुन अनेक वेळा निवेदन दि २९,३० मार्च २०२२ ला जिल्हाअधिकारी कार्यालयसमोर दोन दिवस धरने, आंदोलन ३० मार्च २०२२ ला मोर्चा करूनहि दखल घेतली नाहि.ते  आज हि आपल्या पंचायत समितीत का पडुन आहे गंज खात असल्यामुळे त्या साहित्याच्या रक्केमेची वसुल संबधीत दोषी अधिकारी यांच्याकडुन वसुल करावी व दिव्यांगाना हक्कापासुन वंचीत ठेवणाऱ्याना दिव्यांग हक्क दप्तर दिंरगाई कायद्याप्रमाणे कडक कार्यवाहि करा.

४)  *दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगाचा पाच टक्के निधी दरवर्षी का देण्यात येत नाही न देणार्‍या अधिकारी यांच्या वर कडक कार्यवाहि करावी.

५) दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदानात दोन वेळा चहा साठी दुध मिळत नाही तर ते एक हजार मानधनात महिनाभर कसे जिवन जगत असतील त्यांचा विचार करुन किमान जीवन जगण्यासाठी किमान वेतन प्रमाणे मानधनात दर महा पाच हजार रुपये वाढ करून ते वेळेवर दरमहा देण्यात यावे*
    ६) *अंत्योदय राशन योजनेत दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्रअंत्योदय  राशन व राशन कार्ड देण्याची शासनाने आदेश असुन  प्रशासकिय स्थरावर अंमलबजावणी  तहसिलमार्फत करण्याचे  आदेश दिल्यास त्या दिव्यांगाना अन्न धान्य दिले तर त्यां दिव्यांगाना लाभ दिला तर ते आनदाने सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगण्यासाठी हक्क देण्याचे आदेश द्यावेत*

७) *दिव्यांगाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे व  स्वबळावर व्यवसाय करण्यासाठी  आमदार दिव्यांग निधी दर वर्षी पंधरा लाख रुपये त्यांच्या मतदार संघात दिला तर त्यांना रस्तावर भिक मांगन्याची वेळ येणार नाही म्हणून त्यांना हक्क मिळावे म्हणून आपणच संसदेत कायदा पास करून तेच कायदा आमदार साहेब पाळत नसेल तर दिव्यांग कायदा चा उपयोग काय?*
    
८) *दिव्यांगाना अनेक कायदे शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे दिव्यांगासाठी स्वंतत्र मंत्रालय निर्मिती करून दिव्यांगाना हक्क द्यावा*

९) *ज्या दिव्यांगाना चालता येत नाहि,आपले म्हणे मांडण्यासाठी बोलता येत नाहि,जगात काय चाले ते दिसत नाहि,ऐकु येत नाहि अशाना बस प्रवासात त्यांना व सोबतीला मोफत प्रवासाची सवलत देण्यात यावा,*

१०) *दिव्यांगाना वृध्दाश्रम प्रत्येक जिल्यात स्थापन करण्यात यावे.*

११) *दिव्यांगाना राजकिय आरक्षण  व स्थानिक स्वराज्य कमिटीत सदस्य म्हणून निवड करण्यात यावे  ऊदा संजय गांधी निराधार योजना ईत्यादी निवड करावी*

१२) *प्रत्येक जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन शासन प्रशासन यांची फसवणूक करणाऱ्याthe येथील दिव्यांग विभागातील सामाजिक कार्यकर्ता गोडगोलवार हे दिव्यांगाना सवलतीबदल माहिती विचारली तरी देत नाहित 

,दिव्यांगाना पुरस्कारबदलचा दिलेला गत वर्षीचा प्रस्ताव वरीष्ठाकडे पाठविलाच नाहि आपण दिलेले व
वरीष्ठाचे आदेशाची अंमल बजावणी होत नसल्यामुळे दिव्यांगाना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या अधिकारी यांना निलबित करावे 
    
अशा ज्वलंत दिव्यांगाच्या हक्कासाठी शासन प्रशासनाचा जाहिर निषेध आंदोलनात सहभागी व्हावे 

असे अव्हान दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंटतराव डाकोरे पाटिल,जि.अध्यक्ष ज्ञांनेश्वर नवले,नागोराव बंडे, राजुभाऊ शेरकुरवार,

बालाजी होनपारखे, मगदुम शेख दतात्रय सौनकांबळे, प्रेमसिंग चव्हाण,रंजीत पाटिल, अनिल रामदिनवार,विठ्ठल बेलकर,ईत्यादी कार्यकर्त्यानी केले